बुलढाणा (हॅलो बुलडाणा) घटनात्मक पद ग्रहण करण्यासाठी शपथ ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे ! महाराष्ट्र विधीमंडळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला.यावेळी
सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी आई तुळजा भवानी,छत्रपती शिवराय, माँसाहेब जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वंदन करून व स्मरून आ. गायकवाड यांनी शपथ घेतली.
ही शपथ का घ्यावी लागते या मागचे कारण असे की, जोपर्यंत खासदार किंवा आमदार शपथ घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणत्याही सरकारी कामात भाग घेता येत नाही.त्यांना सभागृहात जागा दिली जाणार नाही. म्हणजे ते निवडून आले असतील पण खासदार मानले जाणार नाहीत,
राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, पंच-सरपंच आणि सरकारी सेवेत असलेले हे पदाची प्रतिष्ठा राखण्याची, प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे काम करण्याची आणि सर्व परिस्थितीत देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्याची शपथ घेतात. हिंदी आणि इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेत शपथ घेता येते.