spot_img
spot_img

तुतारी वाजवणार कोण ? डझनभर भावी आमदार! सिंदखेडराजा विधानसभा संघात वातावरण तापले!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/ दर्शन गवई) मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक पुर्व गाठीभेटी , चर्चा सत्र , मेळावे घेतले जात असून या मतदार संघाचा मीच दावेदार , भावी आमदार असे बॅनर झळकू लागले आहेत . यात डॉ राजेंद्र शिंगणे यांचा कोठेही ” मीच पुन्हा येईल ” असा बॅनर अद्याप झळकला नाही . पक्ष्यांची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी निवडणूक लढविणारच असा निर्णय डॉ सुनील कायंदे यांनी घेतला आहे . तर दिलीप वाघ हे शिवसेना उबाठा गटाकडून प्रयत्नशिल आहेत . योगेश जाधव आणि डॉ शशिकांत खेडेकर हेही शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्नशिल आहे . परंतू योगेश जाधव यांनी युटर्ण घेतल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. वंचित बहूजन आघाडीकडे सविता मुंढे प्रबळ दावेदार आहेत. तर गायत्रीताई शिंगणे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तुतारी वाजवली आहे. अशा किमान डझनभर नेत्यांनी मीच भावी आमदार असल्याचे बॅनर लावल्याने मतदार मात्र शांत आहे .

सिंदखेडराजा मतदार संघात जातीय निहाय मतदार मराठा ( कुनबी ) ८० हजार , वंजारी ६० हजार , माळी ३० हजार , बौद्ध २५ हजार , बंजारा १५ हजार , मुस्लिम २५ हजार , देशमुख १० हजार आणि इतर जातींतील मतदार ६५ हजार ३६० आहेत . असे एकूण मतदार ३ लाख १५ हजार ३६० आहे . जातिनिहाय मतदार हा अंदाज आहे . यात काही प्रमाणात कमी जास्त होऊ शकते . या मतदारसंघात सर्वप्रथम सत्ता मिळवली जगाराव चव्हाण यांनी . त्यानंतर सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी नंतर दोन टर्म तोताराम कायंदे यांचे. आणि त्यानंतर सतत डॉ राजेंद्र शिंगणे पाच वेळा आमदार झाले आहेत . २०१४ साली डॉ राजेंद्र शिंगणे यांनी उभं न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी डॉ शशिकांत खेडेकर यांनी विजय मिळवला होता . आणि ते पाच वर्षे एक यशस्वी आमदार म्हणून मतदारांच्या मनात होते . परंतू २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांचा घात केला . युती धर्म पाळला नाही , पर्यायाने थोड्या मताने त्यांना पराभव पत्करावा लागला . तरीही मतदार संघात स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी विकासाची कामे सुरुच ठेवली . आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट जाऊन कामे करत असल्याने एक सहानुभूती मतदार संघात त्यांची आहे . आज महायुतीची सत्ता आहे . आणि महायुतीचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आहेत . अजित पवार यांच्या गटाकडून ते प्रबळ दावेदार आहेत . परंतू त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलल्याने निवडणूक पुर्वी त्यांच्या हातात नेमकं काय आहे . हे येणारा काळच ठरवेल . मतदार संघातील सर्वच कार्यकर्ते शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात साहेबांनी यावे असा काहीसा दबाव आणला जात आहे . अखेर निर्णय त्यांचा आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात अगोदरच गायत्री शिंगणे यांनी तंबू टाकून आपणच कसे प्रबळ दावेदार आहोत हे दाखवून दिले आहे . गायत्री शिंगणे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचेकडे जाण्याचा मार्ग त्यांना कोणी दाखविला ! असेल तर हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी आता तिही चर्चा सुरू झाली आहे . शिवसेना पक्षाकडे डॉ शशिकांत खेडेकर हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून योगेश जाधव यांच्याकडे पाहिले जात होते . काल त्यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली आहे . नेमकी भेट कशासाठी हे गुलदस्त्यात असले तरी निवडणूक पुर्व गाठीभेटी घेतल्या जात असल्याने त्यांचा मनसुबा उघड झाला आहे . केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांच्या घरातच डाव टाकल्याची चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे . भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ सुनील कायंदे यांनी मतदार संघात दौरे सुरू केले आहेत . पक्षाने आदेश दिले तर बरं नाही दिले तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांची आहे . त्यांनीही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी केली होती . परंतू पवार साहेबांनी कोणताही निर्णय सांगितला नसल्याने आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे . वंचित बहूजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत माळी , बौद्ध , वंजारी समाजाची मते मिळाली असती तर वसंतराव मगर यांना एक नंबरची मते मिळाली असती . पण मगर यांना केवळ प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांची मते मिळाली . बाकी मते विखुरल्या गेली . आज सविता मुंढे वंचित आघाडीच्या प्रबळ दावेदार आहेत . उबाठा गटाकडून दिलीप वाघ यांनी प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त केली आहे . त्यांचा पुर्वीपासून या मतदार संघाशी संबंध राहिला आहे . जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही . एक कृषी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे . २०१४ साली त्यांनाच उमेदवारी जवळजवळ पक्की झाली होती . परंतू त्यांना डावलून खेडेकर मैदानात उतरले होते . काॅग्रेस पक्षानेही उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली असून अशोक पडघान यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे . मनोज कायंदे यांचीही तयारी आहे . परंतू जागा कोणत्या पक्षाला सुटते याकडे लक्ष द्यावे लागेल . असा त्यांचा विचार आहे . या व्यतिरिक्त अनेक कार्यकर्त्यांची भावी आमदार म्हणून बॅनर झळकत आहेत . वेगवेगळी नावे समोर येत आहेत . परंतू मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या युवा नेतृत्वाची गरज आहे एवढे मात्र निश्चित .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!