बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा परिषदेचे कर्तव्यकठोर मुख्य कार्यकारी अधिकरी गुलाबराव खरात यांनी जिल्हातील तब्बल ३५ जि.प. शिक्षकांना पटसंख्या कमी असल्याचा ठपका ठेवून सेवेतून निलंबित केले आहे.मात्र या शिक्षकांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या निर्णयावर पूर्नविचार करून निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने चर्चा करण्यात येऊन निलंबन मागे घेण्यात यावे अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्याने कार्यकारी अधिकरी गुलाबराव खरात यांनी शाळांची झाडाझडती घेतली होती. दरम्यान २० शाळांची पटसंख्या १ ते १० आढळून आल्याने खरात यांनी तब्बल ३५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र या कठोर निर्णयावर पूर्नविचार करून निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ता राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांची आज भेट निवेदनातून केली आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख आशिषभाऊ रहाटे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, आशिष बाबा खरात, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, रफिक शेठ आदी उपस्थित होते.