चिखली (हॅलो बुलढाणा /विनोद झाल्टे) चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच दिवसात तब्बल दहा ते पंधरा हजार नावे वगळण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप माजी आ. तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला आहे. यावर आमदार श्वेताताई महाले यांनी चुप्पी साधल्याचे दिसत आहे. त्यामुळे खरेच यात काही काळे बेरे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने हे षडयंत्र रचले असून, याबाबत जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग यांना देखील करण्यात आली आहे. आ श्वेताताई महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून चिखली विधानसभा मतदार संघातील मुस्लिम मागासवर्गीय व महाविकास आघाडीच्या अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चिखली विधानसभा मतदार संघातील मतदाराची संख्या 80 टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे आगामी काळात विद्यमान आमदारांना पराभव दिसत असल्याचा आरोप देखील महविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. हे आरोप खरे किंवा खोटे आहेत? याबाबत विद्यमान आ. श्वेताताई महाले यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे या आरोपात काही तथ्य आहे का? असा सवाल आता मतदार संघातील नागरिक करीत आहेत एवढे मात्र खरे.