बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या २ ते ३ दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडविल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे कर्जबाजारी होवून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना मदत करावी, तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून १००% नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ॲड.शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात १४ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांनी निवेदन दिले आहे. त्याचबरोबर गेले दोन दिवस ॲड.शर्वरी रविकांत तुपकर ह्या थेट बांधावर जात नुकसानग्रस्तांना धीर देत आहे.
मोताळा तालुक्यातील आडविहीर,वरुड, पिंपळगाव देवी, शेलापूर खुर्द, घुसर बु. या परिसरात पाहणी करून शेतकरी व गावकऱ्यांना धीर दिला.गेल्या २ ते ३ दिवसात झालेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार केला आहे, अनेक ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या आहे तर काढणीवर आलेले सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खरडून गेल्या आहे. त्याचबरोबर शेतांमध्ये पाणी साचून शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. तर काही ठिकाणी घरांचे ही नुकसान झाले आहे. या झालेल्या प्रचंड नुकसानीची ॲड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील आडविहीर,वरुड, पिंपळगाव देवी,शेलापूर खुर्द, घुसर बु. या परिसरात पाहणी केली, बांधवावर जात ॲड.शर्वरी तुपकरांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे कर्जबाजारी होवून आत्महत्येची वेळ शेतकऱ्यांनावर आली आहे. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. तरी सरकारने तात्काळ झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ॲड.शर्वरी तुपकरांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन दिले. सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत पाहू नये, असे देखील ॲड. तुपकरांनी यावेळी म्हटले आहे.