बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाऊल उचलले. मात्र अहोरात्र झटणाऱ्या महिला व बाल विकास विभाग मागील दहा वर्षापासून ‘मिशन वात्सल्य’ या योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेदनांची चाहूल आजपर्यंत विभागांचे मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना लागलेली नाही. हा एक प्रकारे दिव्याखालील अंधारच म्हणावा लागेल.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या सचिव ॲड. सीमा भाकरे यांनी
विदर्भ ते विधान भवन…
दोन दिवसांपूर्वी कार्यालयात सुट्टी टाकून विधान भवन मुंबई येथे जाण्याचा संकल्प केला होता कारण ही तसेच होते.सध्या सगळीकडे वाजत गाजत सुरुवात झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सगळीकडे कार्यालयीन यंत्रणा सक्रिय झालेली दिसते. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही घोषणा एक आशादायी स्वप्न आहे मात्र समाजातील जनसामान्य महिलांना आपली लाडकी बहीण करून त्यांच्या संसाराला हातभार लावणारे महिला व बाल विकास विभाग हा आपल्याच अधिनस्त मागील दहा वर्षापासून मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गत कंत्राटी स्वरूपातकाम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेदनांची चाहूल आजपर्यंत विभागांचे मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना लागलेली नाही, अशी व्यथा भाकरे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ज्या योजनेत अत्यावश्यक सेवा म्हणून दिवस-रात्र या महिला कर्मचारी काम करत आहे तो तसाही सर्वांकडून दुर्लक्षित होणारा विषय आहे तो म्हणजे बाल संरक्षण…कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही, आई होण्यासाठी लागणारी प्रसूती रजा कागदावर सुद्धा नाही तर ही रजा अस्तित्वात देण्याचा प्रश्नच येत नाही. कुठलीही साडी – चोळी नाही तर दिवाळी भेट नाही. कोरोना काळात महाराष्ट्रातल्या 30 हजार एक पालक बालकांसाठी, 9 हजार अनाथ बालकांच्या समुपदेशनासाठी आणि 850 कोव्हिड अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी सातत्यानं काम करत असलेल्या या भगिनी त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहे.बाल विवाह पिडीत मुलींना सांभाळणे, त्यांचे समुपदेशन करणे, दत्तक विधान लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या बालकांना मार्गदर्शन करणे इत्यादी अनेक कामे बाल संरक्षण यंत्रणेत अर्ध्या मनुष्य बळावर सुरू आहे. देशातील बालकांची मोफत फोन सेवा 1098 हीच लोक चालवतात..एका दशकापासून राज्य सरकार यांनी कोणतेही धोरण या कर्मचाऱ्यांसाठी केलेलं नाही, मानधन वाढ आणि कामाचा निश्चित आकृतीबंध देखील अस्तित्वात नाही अशा बिकट परिस्थिती समजतील दुर्लक्षित , सोडून दिलेल्या, अनाथ, एकपालक, व अत्याचाराने पिडीत बालकांचा सांभाळ ह्या महिला करत आहेत ह्या लाडक्या नाहीत का? ह्या लाडक्या देवकीच्या घरात दिव्याखाली अंधार का? असा परखड सवाल ही
ॲड. सीमा भाकरे यांनी रेटला आहे.