spot_img
spot_img

डोळ्यातून नुसतीच ‘भूरभूर’ – जिल्ह्यात 46 टक्के पेरणी, दमदार पावसाची प्रतिक्षा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पाऊस कधी ढगातून बरसतो तर कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून रिपरिपतो.. याचा अनुभव बुलढाणा जिल्हा घेत आला आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात 46 टक्के पेरणी झाली असून, सध्या पावसाने केवळ भूरभूरी लावल्यामुळे ‘या भूरभूर पावसाचा उपयोग काय?, पून्हा आमच्या हाती धुपाटणंच हाय, अशा शब्दात शेतकरी व्यथा मांडतांना दिसताहेत.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम अडचणीत आहे. सलगचा दुष्काळ, गारपीट यांसारख्या आपत्तीमुळे ही दोन-तीन वर्षे शेतीच्या दृष्टीने कठीण गेली. पण यंदा पाऊस चांगला येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.कृषी विभागाने सात लाख 41 हजार 357 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मे महिन्यात पावसाने चांगली सुरवात केल्याने शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला. यंदा काही तरी पिकल आणि विकल, या आशेने
4,24,754 हेक्टरवर सोयाबीनच्या प्रस्तावित पेरणी क्षेत्रापैकी आता पर्यंत
201998.20 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सोयाबीनची 50.88 टक्के व इतर पिकांची 46 टक्के पेरणी झटक्‍यात उरकली आहे.शेतकऱ्यांनी उसनं पासनं, पावणंरावळं करत पेरणीचा मेळ बसवला. पण कसलं काय? पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला परंतू पावसाने दडी मारली असून, नुसताच भूरभूरत आहे.विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. परंतू जोरदार पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे.

▪️राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!