बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आंबाबारवा, रोहिणीखिडकी, चुनखेडी, शेंबा येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी गत पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाची शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी सांगता झाली.
पुनर्वसनाच्या मोबदल्याचे मूल्यांकन अद्याप २००८ प्रमाणे असून, २०१६ मध्ये पुनर्मूल्यांकन केले आणि १० लाख रुपये मोबदला व्याजासह द्यावा, २००८ ते २०१६ दरम्यान विवाह केलेल्या मुलींना मोबदला दिला जावा, अंबाबारवा गावातील नागरिकांचे सर्वेक्षण करून मोबदला दिला जावा, २०१८ च्या शासन निर्णयानुसार पुनर्वसित कुटुंबांना १ एकर जमीन वाटप करण्यात यावी, वाहन खरेदीसाठी सबसिडी सर्व पुनर्वसित नागरिकांना लागू करावी, बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत संधी द्यावी, घरकुल योजनेंतर्गत लाभार्थीना प्राधान्य दिले जावे, वसाडीमध्ये घरकुलासाठी जागा आणि घरकुल मंजूर करावे, अंबबारवा गावातील बंद रस्ता उघडण्यात यावा ज्यामुळे धार्मिक ठिकाणी जाणे शक्य होईल, विजपुरवठा मिळवण्यासाठी महावितरण मार्फत कार्यवाही करावी, अपात्र ठरवलेल्या नागरिकांची फेरतपासणी करून पात्र घोषित करावे, पुनर्वसनामुळे फसवणूक झालेल्या लोकांच्या प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत करून कारवाई करावी, २००८ आणि २०१२ च्या शासन निर्णयांची प्रत पुनर्वसित लोकांना उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यासाठी आंबाबारवा, रोहिणीखिडकी, चुनखेडी, शेंबा येथील ग्रामस्थांनी १० ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. दरम्यान लेखी आश्वासन मिळाल्याने आज उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी अकोटचे सहा. वनसंरक्षक गणेश टेकाळे, महसूल अधिकारी प्रमोद करे , नायब तहसीलदार विजय हिवाळे, यांच्यासह उपोषकर्ते राजेश मोरे, मदन मूलदार
बारक्या मोरे, वयर सिंग जमाददार, चंदन मोरे,
सचिन मुरादम, नंदू मोरे, कमलेश चंगळ आदी उपस्थित होते.