बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धाड परिसरात अवैध रेती तस्करी बिनबोभाट सुरू असून विशेषता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी पकडलेला अवैध रेतीचा एक टिप्पर ठाण्यात लावला परंतु ‘लक्ष्मी भेट’ मिळाल्याने टिप्पर सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘खाकी वर्दी’ रेतीमाफीयांच्या वेसणीला बांधलेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल ‘चोर-चोर भाऊ- भाऊ मलीदा वाटून खाऊ’ या संकल्पेतुन रेती तस्करीचा कारभार चालला असून लाखो रुपयांच्या महसुलाचे भागीदार आहेत तरी किती? हा संशोधनाचा विषय आहे.हे सांगायचे कारण की,धाड परिसरात बेकायदा रेती तस्करी खुलेआम सुरू आहे. एका व्यक्तीच्या गुप्त माहितीवरून धाड पोलिसांनी एक अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला. ठाण्यात लावण्यात आला.त्यानंतर सदर टिप्पर सोडून देण्यात आला.(तडजोड झाली असेल?) दरम्यान या प्रकरणाची माहिती ‘हॅलो बुलढाणा’ला लागली’ ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी दिलेले उत्तर पटण्यासारखे नाही. ते म्हणाले की सदर टिप्पर हा विना नंबर व विना लायसन्स असल्यामुळे आरटीओ विभागाला पत्रव्यवहार करून पंधरा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.त्यानंतर टिप्पर सोडण्यात आला.विशेष म्हणजे जो टिप्पर पकडला होता त्या टिप्पर चालकाकडे जालना जिल्ह्यातील रॉयल्टी होती. आणि तो बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात रेती वाहतूक करताना पकडला गेला.यासंदर्भात तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,धाड पोलिसांनी रेती टिप्पर बाबत आमच्याशी पत्र व्यवहार केलेला नाही.पोलिसांनी अवैध रेती टिप्पर पकडला तर आधी महसूल विभागाला माहिती प्रस्तावित करावी लागते. परंतु धाड पोलिसांनी असे केलेले दिसत नाही. त्यामुळे पोलिसांची करडी नजर रेती तस्करीवर कशी काय पडत नाही? त्यांचे साठे लोटे तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तथा जिल्हाधिकारी यांनी शासनाचा महसूल वाचवायचा असेल तर धाड परिसरातील अवैध रेती वाहतुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे.










