spot_img
spot_img

शासनाचा निष्काळजी कारभार बघा! तहसीलदाराच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्याचा जीव टांगणीला!

किन्होळा,मोताळा (हॅलो बुलडाणा) शासनाच्या महसूल विभागाचा हलगर्जीपणा आणि तहसीलदारांच्या निष्काळजी कारभारामुळे एका शेतकऱ्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. किन्होळा येथील शेतकरी मंगल जनार्दन किन्होळकर यांना वारंवार लेखी नोटीस देऊन शेत रस्ता मोकळा करण्यास सांगण्यात आले. मात्र, तहसीलदारांनी ठरलेल्या दिवशी स्वतः गैरहजर राहून शेतकऱ्यांना उन्हात बसण्यास भाग पाडले.दि. 15 एप्रिल 2025 रोजी महसूल विभागाने रस्ता मोकळा करण्यासाठी नोटीस दिली होती. त्यानुसार किन्होळकर कुटुंब सकाळी 10:30 वाजता शेतात पोहोचले. तहसीलदार मात्र न आलेमुळे ते दुपारी 3:30 पर्यंत प्रखर उन्हात थांबले. या त्रासामुळे त्यांचे वडील व भाऊ दोघांनाही उष्माघात होऊन तातडीने दवाखान्यात भरती करावे लागले.

त्यानंतरही प्रशासनाने दि. 20 मे रोजी पुन्हा नोटीस पाठवून दि. 29 मेला रस्ता मोकळा करण्याचे सांगितले. परंतु त्या दिवशीही अधिकारी वा कर्मचारी कुणीच हजर झाले नाही. यामुळे किन्होळकर यांचा छळ होत असून, जून 2024 मधील मका पीक अजूनही शेतात अडकून आहे.या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी मोताळा तहसील कार्यालयावर असून, या प्रशासनाच्या बेजबाबदारपणाविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे, असा संतप्त सूर शेतकरी वर्गातून उमटतो आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!