बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अंढेरा येथील युवा प्रगतीशील शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या नसून हा शासन व प्रशासनाचा बळी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केली.
शेतकरी कैलास नागरे अनेक दिवसापासून खडक पूर्णा येथील पाणी शेतीसाठी वापरता यावे, यासाठी प्रयत्न करत होते.या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करत होते परंतु त्यांना केराची टोपी दाखवण्यात आली.त्यांना परवानगी देण्यात आली नाही.त् यामुळे त्यांनी आत्महत्या केली हे दुर्दैव आहे.एकीकडे शेतात जे पिकते त्या मालाला भाव नाही.दुसरीकडे शासन पीक विमा या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे.शेतकऱ्यांच्या खातात पिक विमा ची रक्कम जमा झालेली नाही.अशा परिस्थितीत शेतीला पाणी देण्यासाठी जर झगडावे लागत असेल तर,कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जयश्रीताई शेळके यांनी उपस्थित केला आहे.