spot_img
spot_img

💥BREAKING! स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्याची नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मागण्या पूर्ण होत नसल्याने एका शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याची स्वातंत्र्यदिनी खळबळजनक घटना घडली आहे.विनोद पवार असे त्याचे नाव आहे.

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिगाव प्रकल्पावर जिगाव पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलन झालीत. मात्र यंत्रणेला काही फरक पडला नाही. त्यामुळे आज आडोळ खुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले आहे. या आंदोलना दरम्यान विनोद पवार नामक शेतकऱ्याने जलसमाधी घेतली आहे. जल समाधी आंदोलन दरम्यान नदीत उडी घेतल्यानंतर कोणीही विनोद पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून विनोद पवार यांचा शोध घेत आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार उपस्थित अभियंत्याला स्थानिकांकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी अधिकारांवर कारवाईची मागणी नातेवाईक करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!