बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी चांगले व उच्च दर्जाचे अन्न धान्य पुरविण्याकडे व्यापाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, आवश्यक असलेले सर्व परवाने घेऊनच व्यवसाय करवा असे आवाहन अन्न व औषधी प्रशासन, बुलढाणाचे उपायुक्त प्रमोद पाटील यांनी केले.
जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जूनला सर्व जगात साजरा करण्यात येतो.त्याचे औचित्य साधून बुलढाणा येथे 4 जूनला,केमिस्ट भवन येथे किराणा, हॉटेल, कॅटरिंग व औषधी विक्रेत्यांचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त प्रमोद पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करुन पहेलगाम येथे आतंकवादी हल्यात मृत्यू पावलेल्या शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमासाठी मंचावर किराणा असोसिएशन चे अध्यक्ष अमरचंद कोठारी,उपाध्यक्षकिसन पंजाबी, मेडिकल असोसिएशनचे राजू पाटील, हॉटेल असोसिएशनचे दिलीप जाधव,केटरिंग असोसिएशन चे राजेंद्र कायस्थ,आणी मिठाईवाले राणूसींग राजपूत हे उपस्थित होते. व्यापारी वर्गाला मंचावर स्थान देऊन त्याच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा एक नविन दृष्टिकोण यातून साधण्यात आला. व्यापारी प्रतिनिधी तर्फे राजू पाटील व अमरचंद कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले.आणि व्यापारी आणखीन सजग राहून मालाच्या दर्जा कडे विशेष लक्ष देतील असे आश्वासन दिले.
आपले मनोगत व्यक्त करतांना औषधी उपायुक्त गजानन घिरके यांनी सर्व आवश्यक परवाने 100 टक्के घेऊन बुलढाणा केमिस्ट महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून स्वस्थ तना सोबत स्वस्थ मन ही जीवनात तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.यासाठी ध्यान आवश्यक असून त्याचे एक छोटे प्रात्यक्षिक ही त्यानी करुन घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसावे अन्न निरीक्षक, बुलढाणा यांनी केले तर आभार प्रदर्शन घिरके यांनी केले.
कार्यक्रमासाठी नविनच रुजू झालेले अन्न निरीक्षक नवलकर व इतर कर्मचारी वर्ग तसेच व्यापारी मित्र हजर होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.